Sunday, 30 April 2023

ESCY|| Eshrm card yojna || प्रत्येकाला मिळणार दोन लाख सुरक्षा विमा ई श्रम कार्ड योजना,



 आता प्रत्येकाला मिळणार 2 लाखा पर्यंत सुरक्षा विमा ई-श्रम-कार्ड योजनेमार्फत,

आज आपण आजच्या ब्लॉग मध्ये ई श्रम कार्ड योजने बद्दल जाणून घेणार आहोत.
  1. ई-श्रम-कार्ड म्हणजे काय ?
  2. ई-श्रम-कार्ड कसं काढतात ?
  3. ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती ?
  4. ई-श्रम-कार्ड चे फायदे काय ?

  • ई-श्रम-कार्ड माहिती,



  • 26 ऑगस्ट 2021 पासून ई-श्रम-कार्ड योजना सुरू करण्यात आली असून ती योजना केंद्र सरकार व रोजगार मंत्रालयात भारत सरकारकडून सुरू करण्यात आली आहे.

  • सर्वसामान्य जनते साठी म्हणजेच मजूर वर्गासाठी ही योजना आहे उदाहरणार्थ:-  सुतार, लोहार, गवंडी, शेतमजूर, भाजी विक्रेता, रिक्षाचालक, घरगुती काम करणाऱ्या महिला, सामान्य सेवा केंद्र, रस्त्यावरील विक्रेता, दूध घालणारी शेतकरी, स्थलांतरित कामगार, इत्यादी.....


  • ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी लागणारी पात्रता,

:- ई-श्रम-कार्ड काढण्यासाठी तुमचे वय सोळा वर्षे ते 59 वर्ष       यादरम्यान असावे.
:-अर्ज करणारा व्यक्ती कुठलेही टॅक्स व इन्कम टॅक्स भरणारा     नसावा.
:-EPFO आणि ESIC चे सदस्य नसावेत,


  • ई-श्रम-कार्ड साठी लागणारी कागदपत्र,


  1. आधार कार्ड (आधार कार्ड फोन नंबरशी  link असावं)
  2. फोन नंबर 
  3. बँक पासबुक

  • ई-श्रम-कार्ड चे फायदे,


:- प्रधानमंत्री सुरक्षा विमा अंतर्गत २ लाखाचा विमा दिला जातो,
:- प्रत्येक कामगाराला एक ओळखपत्र दिले जाते हे एक खास महत्वाचे क्रमांक म्हणून ओळखले जाते,
:- या माहितीच्या आधारे आपलं सरकार सामाजिक कल्याण व सुरक्षा योजना राबवल्या जातात,
:- येणाऱ्या सर्व सरकारी योजना चा पहिला सर्वात आधी ई-श्रम-कार्ड धारकांना दिला जाईल,
:-कामगाराच्या कार्यशक्तीच्या आधारे त्यांच्या रोजगारांच्या जास्तीत जास्त संधी मिळवण्यात सरकार मदत करते,

Friday, 28 April 2023

घराचे स्वप्न होणार साकार प्रत्येकाला मिळणार घरकुल प्रधानमंत्री आवास योजना,



  • प्रगगगगगगगगगग आवास योजना,

आता घाबरायचं कारण नाही तुमचं आमचं स्वप्न साकार करणार आपलं सरकार या शबरी घरकुल योजना व रमाई घरकुल योजना व महात्मा फुले घरकुल योजना अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना  या योजने मुळे सर्वसाधारण कुटुंबियांना मिळणार घर. ही योजना अनुसूचित जाती जमातीसाठी असते या योजनेअंतर्गत आपल्याला काही निधी प्राप्त होतो तरी पुढील माहिती तपासा.
   

  • वैशिष्ट्ये,

  • आपल्याकडे स्वतःची जागा असणे गरजेचे आहे,
  • जागा असेल पण त्या जागी पक्के घर असेल तर आपण या योजनेस अपात्र ठरतात,
  • जागा असेल पण त्या जागी कच्चे घर असेल तर आपण या योजनेस पात्र ठरतात,
  • आपल्या जागेची नोंद ग्रामपंचायतीत असणे गरजेचे आहे,
  • जागेचा किंवा घराचा उतारा जोडणे गरजेचे आहे व जागा कमीत कमी 300 स्क्वेअर फुट पेक्षा जास्त असणे गरजेचे आहे,
  • तुमच्याकडे जागा नसेल तर घाबरायचं कारण नाही दिनदयाळ योजनेअंतर्गत शासनाकडून 50,000 हजार रुपये अनुदान देण्यात येते,
  • आपल्याकडे 1,20,000 हजार च्या आत मधील तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला असावा,
  • तसेच जातीचा दाखला पण असावा आपल्याकडे जातीचा दाखला नसेल तर कार्यालयातून लवकर काढून घ्यावा तो आवश्यक आहे,
  • आपली जेव्हा ग्रामसभा भरते किंवा मासिक सभा भरते त्यावेळी तुम्ही एक अर्ज ग्रामसभेला करणे गरजेचे आहे या अर्जाच्या माध्यमातून तुम्ही तुमचं प्रकरण पास करण्यास विनंती करावी, ग्रामसभेचा ठराव तुम्ही जर प्रकरणाला जोडला तरच तुमचं प्रकरण पुढे पास केलं जाईल अन्यथा प्रकरण अपात्र ठरविण्यात येईल,
  • 2022-2023 मध्ये एका घरकुलासाठी निधी 1,20,000 हजार असणार आहे


  •  * कागदपत्रे

  1.  रेशन कार्ड ,
  2. आधार कार्ड ,
  3. बँक पासबुक ,
  4. उत्पन्नाचा दाखला ,
  5. जातीचा दाखला ,
  6. जागेचे (पीटीआर) उतारा ,
 घरकुल यादी व घरकुल जीआर पाहण्यासाठी पुढील,
Link ला tap करा:- Pmaygnic.in

    

  • प्रधानमंत्री आवास योजना नाव नोंदणी करण्याचा फॉर्म पुढील प्रमाणे असतो,




Thursday, 27 April 2023

SHBA;आता प्रत्येक शेतकरी बांधवांना पी.एम.सी किसान योजना अंतर्गत सहा हजार (६०००) रुपये मिळणार.....!




आता प्रत्येक शेतकरी बांधवांना पी.एम.सी किसान योजना अंतर्गत सहा हजार (६०००) रुपये मिळणार.....!

शेती ही भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे, आणि शेतकरी बांधव हा अन्नदाता आहे, म्हणूनच आपल् सरकार शेतकरी बांधवांसाठी नवीन नवनवीन योजना घेऊन येत असते ज्यामुळे शेतकरी बांधवाला फायदा होईल आज आपण अशाच एका योजनेबद्दल आपल्याला सांगणार आहोत, ज्याने आपल्या शेतकरी बांधवांना सहा हजार रुपयापर्यंत फायदा होऊ शकतो, या योजनेचे नाव म्हणजे पंतप्रधान किसान योजना व पीएमसी किसान योजना म्हणूनही ही योजना ओळखली जाते..

*:-वैशिष्ट्ये,🔖

:-ही योजना केंद्र सरकार योजना आहे,

:-ही योजना भारत सरकारने 1 डिसेंबर 2018 पासून सुरू केली आहे,

:-या योजनेमध्ये जमीन असणाऱ्या शेतकरी कुटुंबीयांना तीन समान टप्प्यामध्ये दरवर्षी सहा हजार रुपये दिले जाते,              (पती पत्नी व अठरा वर्ष आतील मुलं अल्पवयीन मुल यांना हा निधी दिला जातो असं कुटुंब योजनेसाठी पात्र ठरतं),

:-ही योजना जरी केंद्र सरकारची असली तरी राज्य सरकार व केंद्रशासित प्रदेश प्रशासन संबंधित व्यक्तीचा पात्रता निश्चित करतात,

:-या योजनेचा निधी थेट शेतकरी कुटुंबीयांच्या बँक खात्यात जमा होतो,

:-सुरुवातीला फक्त असे शेतकरी या योजनेचा फायदा घेऊ शकत होते ज्यांच्याकडे दोन हेक्टर शेती आहे पण आता जमीन कितीही असेल तरीपण शेतकरी बांधव इतर अटी त जर बसत असेल तर ते या योजनेचा लाभ घेऊ शकतो,

*:-पात्रता,📝

(1) कुठलीही संस्था जिच्या नावे जमीन आहे ती संस्था अपात्र ठरते,

(2) पदावर असलेले म्हणजेच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, सरन्यायाधीश, इत्यादी या योजनेस अपात्र ठरतात,

(3) माझी किंवा विद्यमान खासदार, आमदार, मंत्री राज्यमंत्री, महापौर, किंवा जिल्हा पंचायत तिचे अध्यक्ष, इत्यादी या योजनेतून वगळण्यात आलेले आहेत,

(4) जे सरकारी कर्मचारी आहेत हे या योजनेचा लाभ घेऊ शकतात पण फक्त चतुर्थ श्रेणी किंवा सहाय्यक कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतात,

(5) सेवानिवृत्त कर्मचारी ज्याचे मासिक पेन्शन १०,०००₹ किंवा त्यापेक्षा जास्त आहे असे कर्मचारी या योजनेसाठी अपात्र ठरतात परंतु जे सरकारी कर्मचारी चतुर्थ श्रेणी व सहाय्यक कर्मचारी आहे त्यांचे पेन्शन १०,०००₹ पेक्षा जास्त जरी असेल तरीही ते या योजनेस पात्र ठरतात,

(6) ज्यांनी मागील वर्षात कर भरला आहे ते शेतकरी बांधव या योजनेस पात्र ठरतात,

(7) डॉक्टर, अभियंते, वकील, चार्ट अकाउंटंट, आणि वस्तूविशारद, यासारखे व्यवसायिक या योजनेतून वगळण्यात आलेली आहे,

(8) थोडक्यात सांगायचं म्हटलं तर या योजनेला फक्त असे व्यक्ती पात्र ठरतात ज्यांना त्या योजनेची खरोखरच गरज आहे, 

*:- लागणारी आवश्यक कागदपत्रे 📝

  1. बँक पासबुक,
  2. आधार कार्ड,
  3. ७/१२ किंवा ८ अ उतारा,
  4. मोबाईल नंबर आधार कार्ड ची लिंक असावा,
  5. आधार कार्ड बँक अकाउंट ची लिंक असावं,

* :- नाव नोंदणी,

:- आपण स्वतः कागदपत्रे घेऊन तलाठी कार्यालयात जाऊन नाव नोंदणी करू शकता,

:- ग्राहक सेवा केंद्र व इंटरनेट कॅफे मध्ये ही जाऊन आपण नाव नोंदणी करू शकता मात्र तिथे आपल्याला काही रक्कम भरावी लागेल,

:-आपण स्वतः पीएम किसान पोर्टलवर जाऊन नाव नोंदणी करू शकता मात्र ते आपल्याला काळजीपूर्वक करावा लागेल.

P.M किसान पोर्टल link :-https://pmkisan.gov.in/



                                 

Digital INDIA||पंतप्रधान आभा कार्ड योजना,

 माननीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांच्या संकल्पनेतून digital India सुरुवात झालेली आहे आभा health card हे आयुष्यमान भारत digital mission चा...